कराडच्या उड्डाणपूल आराखड्यात कराड व मलकापूर शहरात जाण्यासाठी वळण मार्ग करावा अन्यथा आंदोलन...

कराडच्या उड्डाणपूल आराखड्यात कराड-मलकापूर शहरात जाण्यासाठी वळण मार्ग करावा अन्यथा आंदोलन उभारणार; आनंदराव पाटील...

कराड दि.19- पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे साडे तीन किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यात आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीनपूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा प्रस्तावित होता. मात्र पुलाच्या मूळ आराखडयात कोणाच्या तरी हस्तक्षेपाने बदल करण्यात आला असून हा उड्डाणपूल थेट वारुंजी-गोटे गावच्या हद्दीपर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिल्या आराखड्यात कराड शहरात जाण्यासाठी वळणमार्ग होता. मात्र नवीन आराखडयात तो नसल्याने दोन शहराच्या व्यापारांचे नुकसान होणार आहे. कराड-मलकापूरच्या हितासाठी खा. उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय लढा उभारणार असून कराडचे महत्व कमी करणार असाल तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा माजी आ. आनंदराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कराड विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हरीश जोशी, राजू मुल्ला, एकनाथ बागडी, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, आर टी स्वामी, दादा सिंगन, घनश्याम पेंढारकर, आनंदराव लादे, माधवराव पवार, चंद्रकांत पवार, सागर बर्गे, नितीन काशीद सुलोचना पवार व कराड मलकापूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सातारा शहराचे जर आपण पाहिले तर सातारा येथील हॉटेल फर्न येथे हायवे खाली उतरवून शहरातील लोकांना अप्रोच रस्ता देऊन पुन्हा पुणे-मुंबईकडे रस्त्याचा उड्डाणपूल प्लान केला आहे. त्याच प्रमाणे कराड शहरामध्ये पूर्वीप्रमाणे दोन्ही कराड व मलकापूर शहरांचे अस्तित्व अबाधित ठेवले पाहिजे, अशी प्रामुख्याने आमची अग्रही मागणी आहे.

सन 2020-2021 साली एनएचएआयचा कराड मलकापूर फ्लायओवर ब्रिजचा DPR प्लान हा वेगळा होता व आज काम वेगळ्या प्लानप्रमाणे चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब कमानी पुढे कोयना नदीच्या अलीकडे उतरणारा DPR मंजूर प्लान होता. परंतु हा प्लान आज रोजी नांदलापूर ते नदी पलीकडे वारुंजी-गोटे फाटा ओवरब्रिज असा केला गेला आहे.

कराड शहारच्या सर्वांगीण विकासकारिता पूर्वीच्या 2021 प्लाननुसार कोणतेही नॅशनल हायवेचे वाहन हे कोयना नदीपूर्वी कराड शहरामध्ये उतरणार होते आणि याचा फायदा सर्व व्यापारी व नागरिकांना होणार होता. परंतु सदर प्लानमध्ये आज रोजी हा बदल कोणाच्या हस्तक्षेपामुळे होत आहे का? याचे कारण काय? आणि शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना आयुष्यभर वारुंजी फाटयावरून परत शहरामध्ये येण्याची शिक्षा का?

कराडचे लोणावळासारखे चित्र होऊ नये म्हणून सन 2021 पासून याचा पाठपुरावा करत आहोत आणि याचेच कारण की सदर एनएचएआय अधिकारी यांनी आदर ठेवून अजूनही उत्तर दिशेला म्हणजेच कोयना नदीकडील बाजूला फ्लायओवरचे काम अजूनही चालू केले नव्हते. परंतु हे किती दिवस थांबणार, या प्रकरणामध्ये खा .उदयनराजे भोसले यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी कराडचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून कराड व मलकापूरचे लोकप्रतिनिधी यांचे समवेत मिटिंग करून संबंधित एनएचएआय अधिकारी यांना सूचनाही दिलेल्या आहेत. कराडच्या हॉटेल फर्ण येथील ना. नितीनजी गडकरी साहेब यांच्या बैठकीमध्ये निवेदन दिले होते व सन 2021 पासून आम्ही केलेले सर्व पत्रव्यवहार घेऊन आम्ही कराड शहारच्या व मलकपूरच्या अस्तित्वासाठी लढा देणार आहोत.

कराड शहराच्या व मलकापूर शहराच्या ठिकाणी होणारा नवीन फ्लायओवर ब्रिज हा 678.830 ते 682.300 KM या ठिकाणी असून त्याचा ग्रेडीयंट स्लोप हा उत्तर (कोयना नदी) बाजूला 682.450 KM होता, परंतु आज हा प्लान बदलून फ्लायओवरचा ग्रेडीयंट स्लोपे हा 682.850 KM जोडून कराड शहराचे ट्रफिक किंवा हायवेवरुन येणारे ट्रफिक हे वारूंजी फाटावरुन परत कराडमध्ये आणण्याचा घाट रचला गेला आहे. असे जर झाले तर बेंगलूरू, कोल्हापूरवरुन येणारा माणूस हा कराड शहरामध्ये कधीच उतरणार नाही आणि तसाच पुढे निघून जाणार आणि निकाली कराड शहराचे अस्तित्व हळूहळू संपणार असून सर्व व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांना याचा निश्चित तोटा होणार आहे. सातारा, सांगली पश्चिम महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असणारे आपले कराड शहर नॅशनल हायवेपासून वंचित होणार, असे चित्र आजरोजी दिसत आहे व याचा विचार होणे गरजेचे आहे.

या संदर्भात खा. उदयनराजे भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, राजेंद्रसिंह यादव यांनी कराडमध्ये नगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासमवेत मीटिंग घेतली व कराडचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून तसा प्लान करून ना. नितिन गडकरी यांच्या कडे पाठवावा, असे निर्देश दिले आहेत, तसेच कराड येथील भेटी प्रसंगी ना. देवेंद्रजी फडणवीस यांना ही यासंबंधी निवेदन माजी आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहे. त्यांनी सुद्धा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण तसेच प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांना कराड व मलकापूरच्या दृष्टीने व लोकांना याचा लाभ होईल, या हेतुने पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनाही याबाबत आम्ही निवेदन दिले आहे.

आपण नागरिकांनी याचा विरोध करून कराड शहरमध्ये हायवे ट्रफिक उतरण्याचे ठिकाण हे कोयना नदी अलिकडेच पाहिजे आणि ते म्हणजे झीरो लेवल 682.300 KM स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्वागत कमानी पुढे व कोयना नदीच्या अलीकडेच शहर हद्दीत हवे.

कराड शहराचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्याचा आज हाच तो क्षण आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांना आवाज देतो की चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न सकारूया आणि शहरचे अस्तित्व अबाधित ठेवू. याबाबत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून लढा देण्यात येणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक