टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला;आ. पृथ्वीराज चव्हाण...

 


टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला;आ. पृथ्वीराज चव्हाण...

कराड दि.20-शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळाची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नसून भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला आहे. ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ व पहिलीच घटना असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभास सदिच्छा भेटीप्रसंगी आ.चव्हाण बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजंेद्र लाटकर, अध्यक्ष डाॅ. अनिल हुद्देदार, सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, संचालक उदय थोरात, कौन्सिल सदस्य, अॅड. विक्रम कुलकर्णी, अॅड. सदानंद चिंगळे, सुधीर घाटे, डाॅ. मीना पेंढारकर, इंद्रजित चव्हाण, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.जी अहिरे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.चव्हाण पूढे म्हणाले शंभर वर्षाची शैक्षणिक परंपरा अखंडित राखणे एवढी सोपी बाब नाही. मात्र शिक्षण मंडळाने ती जोपासली आहे. त्याबद्दल शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिका-यांचे मी अभिनंदन करतो. संस्थेची शिक्षण क्षेत्रातील भरभराट पाहून आनंद वाटतो. शिक्षण संस्था आदर्श कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण मंडळ आहे. देशप्रेमाचे धडे देणारी व राष्ट्रीय शिक्षणाचा पाया असणा-या टिळक हायस्कूलमध्ये मी शिकलो याचा मला अभिमान वाटतो. एकाच संस्थेने व शाळेने दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला देणारी टिळक हायस्कूल एकमेव शाळा आहे. हा शिक्षण क्षेत्रातील इतिहास आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेब , आॅलिम्पिकवीर खाशाबा जाधव, कोल्हटकर असे शेकडो विद्यार्थी देशाच्या उभारणीत संस्थेने व शाळेने दिले आहेत. संस्थेने सर्वच शाखांच्या माध्यमातून उच्च गुणवत्ता जोपासली आहे, म्हणून आज संस्थेचे महाराष्ट्रात आदराने नाव घेतले जाते. देशविदेशात असणा-या पंधरा हजार माजी विद्यार्थ्यांचा डेटाबेस एकत्र करण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी संस्थेसाठी व शाळेच्या मदतीसाठी पुढे येवून सहकार्य करावे. 

ते म्हणाले, कोरोना महामारी व युक्रेन रशिया युध्दामुळे जगात मंदीचे सावट आहे. हे भीषण वास्तव म्हणजे भविष्यातील जागतीक मंदिचे द्योतक आहे. आजचे विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडतील तेव्हा नोकरीच्या संधी कमी होतील. संगणक, रोबोटमुळे मनुष्यबळ कमी होत आहे. देशात नवीन गुंतवणूक नाही, नविन व्यवसायांची निर्मिती नाही. त्यामुळे बेकारीचे प्रमाण अधिक वाढेल हे नाकारता येत नाही. हे वास्तव स्विकारण्यासाठी व स्वतःला घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून बहूश्रूत व्यक्तिमत्व निर्माण करावे. त्याचबरोबर दैनंदिन अवांतर वाचन करुन दैनंदिनी लिहिण्याची सवय लावून घ्यावी. तसेच उच्च ध्येय ठेवून संपूर्ण जगच आपले व्यासपीठ आहे असे मानून त्या व्यासपिठावरती स्वतःला सिध्द करावे. 

बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत अनेक नेतृत्ववान विद्यार्थी दिले आहेत. स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेब, खाशाबा जाधव, श्री कोल्हटकर, व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांनी संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढविलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी अनेक उच्च पदांवरती कार्यरत असताना विकासकामांची गती वाढविली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वेळी संस्थेला भरभरुन मदत केली आहे. याहीपुढे मदत करण्याचे आश्वासन बाबांनी आम्हास दिले आहे.  

सचीव चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षण मंडळाचा नावलौकिक आहे तो नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. शंभर वर्षात संस्थेने अमुलाग्र बदल केलेले आहेत. भारत सरकारच्या नॅशिनल टेस्टिंग एजन्सीच्या (एन टी ए) माध्यमातून नीट व जेइइ  या आॅनलाईन परीक्षा केंद्राची मान्यता संस्थेस प्राप्त झाली आहे. आज संस्थेमध्ये विविध आठरा कोर्सेस सुरु असून दहा हजाराच्या वर विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. 

उपस्थित मान्यवरांचे स्वागत बाळासाहेब कुलकर्णी चंद्रशेखर देशपांडे , अनघा परांडकर यांनी केले. बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. चंद्रशेखर देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. टिळक हायस्कूलचे उपशिक्षक भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. लाहोटी कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक