खा.श्रीनिवास पाटील यांनी जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे दिमाखात वितरण...
खा.श्रीनिवास पाटील यांनी जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे दिमाखात वितरण...
कराड दि.15 (प्रतिनिधी) विजय दिवस समारोह सोहळ्याच्या निमित्ताने गेली 25 वर्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी केलेल्या कामाचे वर्णन करेल तेवढे कमीच आहे, त्यांनी दिलेले योगदान फार मौल्यवान असून सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणीसाठी मार्गदर्शन करण्याबरोबर समाजासाठी व तरुण पिढीसाठी दिलेले योगदान फार मोलाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
विजय दिवस समारोह समारोह निमित्त आयोजित यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात वळसे-पाटील बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील व विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मा. वळसे पाटील पुढे म्हणाले की जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खा. श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खा. पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे. त्यांचे समाजासाठीचे, तरुण पिढीसाठीचे योगदान मोठे आहे.
विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवन गौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांना माजी गृहमंत्री आ. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रिगेडीयर जेम्स थॉमस यांच्यावतीने मेजर मिश्रा यांनी तर साताऱ्याचे पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यावतीने पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण, तळबीड (ता. कऱ्हाड), आदर्श माता बाळुताई ढेबे, (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (लाहोटी कन्याप्रशाला कऱ्हाड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड) यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात करण्यात आला.
यावेळी खा. पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सानिध्यात मी वाढलो. मी त्यांच्यामुळे खासदार झालो. भारतीय सैन्यदलाची शिस्त कऱ्हाडकरांना लावण्यात कर्नल संभाजीराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. मी पुण्याचा कलेक्टर, नागपुरचा आयुक्त म्हणुन काम करुन लोकांची सेवा केली. कर्नल पाटील यांनी कऱ्हाडला सैन्यदलाची माहिती व्हावी यासाठी विजय दिवस समारोह साजरा केला. त्यांचे योगदान मोठे आहे. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या भुमीत मला विजय दिवस समारोह समितीने यशवंतराव यांच्या नावाने देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो.
गौरव ग्रंथाचे प्रकाशन....
ज्यांच्यामुळे कऱ्हाडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे ते विजय दिवसचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारीत ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल पाटील यांनी विजय दिवस समारोह सुरु करण्यामागची कहानी सांगुन माझा झालेला सन्मान हा भारतीय सीमेवर वजा तपमानाता कार्यरत असलेल्या जवानाचा असल्याचे सांगीतले.
Comments
Post a Comment