Posts

सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव...

Image
  सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव ... कराड, दि. 2 - जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय कराड तर्फे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटना व प्रत्यक्ष घडलेला इतिहास अनुभवण्यासाठी शाळेच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यालयाच्यावतीने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात.  प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, सचिव अनिल कुलकर्णी व मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांच्या प्रेरणेने व समन्वयक विजय कुलकर्णी व स्वाती जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि बाका प्रसंग म्हणजे पन्हाळा वेढ्यातून विशाळगडाकडे करून घेतलेली सुटका व घोडखिंड मध्ये बाजीप्रभू / फुलाजी प्रभू व सिद्धीच्या सैन्यासोबत झालेला लढाईचा थरारक इतिहास, बाजीप्रभू व त्यांच्या सैन्यानी स्वराज्...

सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजनांचा समावेश त्वरित केंद्राच्या जलद सिंचन लाभ कार्यक्रमात करावा - आ. डॉ. भोसले

Image
सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजनांचा समावेश त्वरित केंद्राच्या जलद सिंचन लाभ कार्यक्रमात करावा - आ. डॉ. भोसले कराड, ता. २ : राज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येत अनेक सहकारी तत्वावर चालणाऱ्या उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांना उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी, त्यांचा समावेश केंद्राच्या जलद सिंचन लाभ कार्यक्रमात करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत केली. या योजनांचा समावेश जलद सिंचन लाभ कार्यक्रमात झाल्यास, याचा फायदा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.  महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला दोनच दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात जनतेचे अधिकाधिक प्रश्न मांडण्याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील आहेत. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या सत्रात औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना आ.डॉ. भोसले यांनी सहकारी तत्वावरील उपसा सिंचन योजनांचा महत्वाचा विषय सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आ...

आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मभूषण बाबा कल्याणी यांना जाहीर

Image
आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मभूषण बाबा कल्याणी यांना जाहीर कराड, दि.1 : येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात यंदाचा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार-2025’ आंतरराष्ट्रीय किर्तीचे उद्योगपती, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स, नवी दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष, भारत फोर्ज लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबा एन. कल्याणी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, राजेंद्र माने, विजय साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, संयोजक समिती सदस्य अल्ताफहुसेन मुल्ला, सौ. शोभाताई पाटील आदी उपस्थित होते. डॉ. गुजर म्हणाले, कराडचे सुपुत्र स्व. पांडुरंग दादासाहेब पाटील तथा पी. डी. पाटीलसाहेब यांच्या गौरवार्थ आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेली तीस वर्षाहून अधिक काळ कराड येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय सन 2011 पासून घ...

कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड

Image
कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश कुर्ले यांची निवड  कराड, दि. 29 (प्रतिनिधी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या कराड तालुका वाहतूक आघाडीच्या अध्यक्ष पदी नागेश अरुण कुर्ले यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने केली असून निवडीचे नियुक्ती पत्र नुकतेच कुर्ले यांना देण्यात आले आहे. कराड शहरातील नागेश कुर्ले हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यशवंतराव चव्हाण ऑटो रिक्षा गेटचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडी गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याअध्यक्ष राहूल होनकळस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वाहतूक आघाडीची बैठक झाल्यानंतर वाहतूक आघाडीच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मा.श्री. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने कुर्ले यांची रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वाहतूक आघाडी कराड तालुका अध्यक्ष या पदी २ वर्ष कालावधी साठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल वाहतूक आघाडीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आज वाहतूकदारांना खंबीर नेवृत्त्वाची गरज अस...

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे यशस्वी निवड

Image
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे यशस्वी निवड कराड, दि. 28 : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुण्यातील नामांकीत कंपनीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  याबद्दल अधिक माहिती देताना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. नामदेव जाधव म्हणाले, आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच, शिक्षणानंतर उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नामांकीत कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी, संस्थेच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने नियमितपणे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. नुकतेच पुण्यातील सुप्रसिद्ध अजिओ फार्मास्युटिकल्सने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये, संस्थेत बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेह...

कराडमध्ये भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन

Image
  भाजपा महिला मोर्चातर्फे शुक्रवारी कराडमध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन आणीबाणीच्या काळातील लोकशाही हल्याची होणार चर्चा; पदाधिकारी होणार खासदारांच्या भूमिकेत सहभागी कराड, दि. 26 : भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने शुक्रवारी (ता. २७) कराडमधील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘मॉक पार्लमेंट’मध्ये भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी खासदारांच्या भूमिकेत सहभागी होत, आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्याची चर्चा करणार आहेत.  १९७५ साली लागू झालेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानला जातो. त्या काळात मानवी हक्कांची गळचेपी, स्वातंत्र्याचा संकोच आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांची कुचंबणा यांचा संपूर्ण देशाने अनुभव घेतला होता. २१ महिन्यांच्या त्या अंधकारमय कालखंडाची आठवण आजही देशवासीय विसरलेले नाहीत. या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळातील लोकशाहीवरील हल्याची ...

सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले

Image
सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिचा सत्कार करताना आ. डॉ. अतूल भोसले व इतर ... सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले सुभीतच्या नीट आणि जेईईमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  कराड, दि. 26 - कराडची माती मूळचीच गुणवत्तापूर्ण असून येथील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. स्पर्धात्मक काळात बिहारमधून कराडमध्ये येत येथील विद्यार्थी यशस्वी करण्याचे काम सुभीत अकॅडमीतर्फे केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून या अकॅडमीच्या यशस्वी निकालाचा राहिलेला चढता आलेख कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.  येथील शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीतील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांच्या आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे, अकॅडमीचे संचालक सुभीत यादव, नायब तहसीलदार बी. डी. कुंभार, माजी नगरसेविका अंजली कुंभार, कै. काशिनाथ नारायण प...