Posts

कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर...

Image
  कृष्णा’च्या महिला शेतकरी ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी रवाना;'व्हीएसआय'चे पुणे येथे चार दिवसीय शिबिर... शिवनगर, दि.19 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवसीय शिबीरासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या १५ महिला शेतकरी रवाना झाल्या असून, त्यांना अत्याधुनिक ऊसशेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतकर्‍यांना दरवर्षी ऊसशेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, ऊसाच्या प्रतिएकरी उत्पादनवाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील महिला शेतकर्‍यांना या शिबीरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे येथे आयोजित शिबीरासाठी रवाना झालेल्या महिला शेतकऱ्यांना संचालक संजय पाटील, बाजीराव निकम, विलास भंडारे, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या. शिबीरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यव...

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्याच्या विरोधात कराडमध्ये भाजपाची तीव्र निदर्शने....

Image
  पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्याच्या विरोधात कराडमध्ये भाजपाची तीव्र निदर्शने.... पाक मंत्र्याच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांकडून जोडे मारो; पोलिसांकडून आंदोलकांना अटक.... कराड, दि.17 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद टीका करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीने कराड येथील दत्त चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारत, आपला निषेध व्यक्त केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने देशभर जोरदार आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून कराड येथे भाजपाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘बिलावल माफी मांगो’ अशा घोषणा देत भुट्टो यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकां...

कराडला हजोरोंच्या उपस्थित विजय दिवस समारोह सोहळा उत्साहात संपन्न....

Image
कराडला हजोरोंच्या उपस्थित विजय दिवस समारोह सोहळा उत्साहात संपन्न.... कराड दि.16-(प्रतिनिधी) 1971 च्या बांगला मुक्ती संग्रामातील दैदिप्यमान विजया प्रित्यर्थ कराड येथे गेली 25 वर्ष विजय दिवस समारोह सजरा केला जातो. यावर्षी विजय दिवस समारोहर समितीचे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहाने व दिमाखदार व हजारोंच्या उपस्थित साजरा करण्यात आला. या समारोहासाठी देशाचे माजी संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावून गेली 25 वर्ष मोठ्या उत्साहात व दिमाखदार पणाने विजय दिवस साजरा करणाऱ्या निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी लेफ्टनंट जनरल जे एस पन्नू, खा. श्रीनिवास पाटील,आ. बाळासाहेब पाटील तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. कराडला 1998 साली पहिल्यांदा विजय दिवस कराडच्या शिवाजी स्टेडियमवर साजरा करण्यात आला. त्यानंतर निवृत्त करणार संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय दिवस समारोह समितीची स्थापना करण्यात आली. नि.कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नि.कर्नल एम डी कुलकर्णी व आजी माजी सैनिकांच्या पुढाकाराने अव्यातपणे अविर...

खा.श्रीनिवास पाटील यांनी जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे दिमाखात वितरण...

Image
खा.श्रीनिवास पाटील यांनी जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे दिमाखात वितरण... कराड दि.15 (प्रतिनिधी) विजय दिवस समारोह सोहळ्याच्या निमित्ताने गेली 25 वर्ष निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांनी केलेल्या कामाचे वर्णन करेल तेवढे कमीच आहे, त्यांनी दिलेले योगदान फार मौल्यवान असून सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणीसाठी मार्गदर्शन करण्याबरोबर समाजासाठी व तरुण पिढीसाठी दिलेले योगदान फार मोलाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. विजय दिवस समारोह समारोह निमित्त आयोजित यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात वळसे-पाटील बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील व विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. मा. वळसे पाटील पुढे म्हणाले की जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या भुमीत कर्नल संभाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन खा. श्रीनिवास पाटील यांनी देण्यात आलेला पुरस्कार हा मोठा आहे. या पुरस्काराला साजेश काम खा. पाटील यांनी केले आहे. कर्नल पाटील यांनी सामान्य लोकांनी मिल्ट्रीचे वातावरण कसे असते, त्यांचे जीवन कसे असते हे जवळुन दाखवण्याचे काम केले आहे....

'एकात्मता दौड'मध्ये धावले सैन्य दलातील जवान व शेकडो शालेय विद्यार्थी...

Image
  'एकात्मता दौड'मध्ये धावले सैन्य दलातील जवान व शेकडो शालेय विद्यार्थी... कराड दि.15 (प्रतिनिधी) विजय दिवस समारोह समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमिवर काढण्यात आलेल्या एकात्मता दौडला कराडात मोठा प्रतिसाद मिळाला. सैन्यदलातील जवानांसह शहरातील विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, नागरिक, महिलां ही या दौडमध्ये सहभागी झाले होते. विजय दिवस चौकात प्रारंभ झालेली दौडची संपूर्ण शहरातून येऊन स्टेडिअमवर पर्यावरणाची शपथ घेऊन सांगता झाली. विजय दिवस समारोह समितीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दोन वर्षांनंतर यंदा दिमाखदार विजय दिवस समारोह निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. त्यानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सैन्य दलातील जवानांसह विद्यार्थ्यां, नागरिक व महिला ही सहभागी झाल्या. विजय दिवस चौकात सकाळी या दौडचा शूभारंभ माजी आ. आनंदराव पाटील, नि.कर्नल संभाजीराव पाटील, उद्योजक सलीम मुजावर, सह्याद्री हॉस्पीटलचे दिलीप चव्हाण, मनसेचे शहाराध्यक्ष सागर ...

महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यदलात अधिकारी व्हावे;कर्नल संभाजीराव पाटील, माजी सैनिकांच्या मेळाव्यात आवश्यक मदत करण्याची ग्वाही...

Image
  वीर पत्नी यांचा सन्मान करताना कर्नल डी. के. झा. समवेत विक्रम मोहिते, संभाजीराव पाटील, श्री. यादव, उत्तम दिघे, विजय पवार, अॅड. संभाजीराव मोहिते, रामचंद्र जाधव... महाराष्ट्रातील तरुणांनी सैन्यदलात अधिकारी व्हावे;कर्नल संभाजीराव पाटील, माजी सैनिकांच्या मेळाव्यात आवश्यक मदत करण्याची ग्वाही... कराड दि.14- सैन्यदलातील जवानांचा समाजात आदर हा झालाच पाहिजे. माजी सैनिकांनी देशाचा आदर्श नागरीक बनुन समाज सुधारणेसाठी प्रयत्न करावा. आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील सर्वांना शिस्त लावुन प्रत्येक घरातील एकतरी तरुन सैन्यदलात भरती होवुन तो अधिकारी व्हावा यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी लागेल ती मदत दिली जाईल. माजी सैनिकांना आपसातील, भावकीतील मतभेद मिटवुन एकोप्याने रहावे, असे आवाहन कर्नल संभाजीराव पाटील यांनी केले.  माजी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आयोजीत माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कर्नल डी. के झा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, भुमि अभिलेख उपाधिक्षक बाळासाहेब भोसले, अॅड. संभाजीराव मोहिते, स्टेट बॅंकेचे अधिकारी यादव, लेष्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, कॅप्टन ...

पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाने नांदलापूर वृध्दाश्रम आनंदाने फुलले...

Image
  पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाने नांदलापूर वृध्दाश्रम आनंदाने फुलले... प्रतिनिधी-दि.14- (प्रतिनिधी) पै. रणजित मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शंभूरत्न परिवर्तन फौंडेशन संचलित 'वृध्दाश्रम' नांदलापूर येथे भेट दिली.त्यांच्यासह दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पै. सागरदादा शिंदे व कराड शहराध्यक्ष अभिजित थोरवडे अनेक मान्यवरांसह उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीतीने नांदलापूरचा वृध्दाश्रम आनंदाने फुलून गेला. 'कर्मन्यवाधिकारस्ते मा फलेष्यू कदाचन्' ...कसल्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम सेवा हे सत्य वचन. महाराष्ट्र ही साधू संतांच्या विचाराने पवित्र व पावन झालेली भूमी आहे आणि याच विचाराने प्रेरित झालेली मोठ्या मनाची माणसं म्हणजे दया करूणेचा सागर. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र निवारा लागतो. नव्हे या मूलभूत गरजा आहेत. आपण अगदी चांगल्या पद्धतीने जगतो पण आज ज्यांना खऱ्या अर्थाने या गोष्टींची गरज आहे; जे अशा गोष्टींनी वंचित आहेत अशा वृद्ध निराधारांसाठी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनचे सचिव विकास भाऊ सूर्यवंशी धावून आले व त्यांना साहित्यिक कवी सत...