Posts

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे - पृथ्वीराज चव्हाण

Image
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे - पृथ्वीराज चव्हाण कराड, दि. 12 (प्रतिनिधी) - ज्या देशात महिलांचा अर्थव्यवस्थेत वाटा राहील त्याचवेळी तो देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात केले.  यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. मानसी दिवेकर या व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी पं. स. सदस्य नामदेवराव पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली थोरात, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, सत्यजित ग्रुप च्या संचालिका भाग्यश्री पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण आदी सह कराड दक्ष...

अहिल्यादेवी होळकर शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक - प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे

Image
कराड : स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे, समवेत सौ. डॉ. सुचेता हुद्देदार. अहिल्यादेवी होळकर शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक - प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - एक प्रेरक व्यक्तिमत्व" विषयावर व्याख्यान कराड, दि. 12 (प्रतिनिधी) : - छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगासाठी एक आदर्शवत राजे होते. त्यांची युद्धनीती, राजनीति, नीतिमूल्ये, वैचारिक प्रगल्भता आजही जगासाठी प्रेरक आहे. अनेक राजे, महाराजे, युगपुरुषांनी त्यांच्या विचारांनुसार वाटचाल केली. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा अग्रक्रमाने समावेश असून त्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक होत्या, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे यांनी केले. येथील स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात मंगळवार (दि. ११) मार्च रोजी जागतिक महिलादिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त महिला समन्वय समिती आणि लोककल्...

अवैध ठरलेल्या मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांच्यासह दहा जणांचे अपील दाखल.

Image
अवैध ठरलेल्या मानसिंगराव जगदाळे, निवास थोरात यांच्यासह दहा जणांचे अपील दाखल.  सह्याद्री सहकारी कारखाना निवडणूक. कराड, दि. 11 (प्रतिनिधी)  सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच 251 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी नंतर 205 अर्ज उरले होते. सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात या दोघांसह अवैध ठरलेल्या दहा जणांनी पुण्यात प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपील दाखल केले असून त्यावर गुरुवार दिनांक १३ मार्च २५ रोजी दुपारी १ वाजता सुनावणी होणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित यशवंतनगर तालुका कराड संचालक मंडळ निवडणूक २०२५ निवडणुकीच्या प्रक्रियेत 10 उमेदवारांनी आपले अर्ज अवैध ठरवल्याच्या विरोधात प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग यांच्याकडे दादा मागितली आहे त्यामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग चढू लागला आहे. दरम्यान आज ११ मार्च अखेर एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही.  निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी मध्ये २०५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर २९ उमेदवार...

लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचे विचारांचा वारसा जोपासत वाटचाल सुरु- रविराज देसाई (दादा)

Image
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा जोपासत वाटचाल सुरु- रविराज देसाई (दादा) लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 115 वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न... दौलतनगर दि.10 - महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. स्व.लोकनेते साहेब यांनी राज्याचे विविध खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहे. दुरदृष्टी लाभलेले नेते स्व.लोकनेतेसाहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या आपल्या पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या मतदार संघात लोकनेते साहेब यांच्या कार्याला शोभेल असे काम महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई करीत असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा जोपासत आपल्या उद्योगसमुहाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांनी केले. दौलतनगर ता.प...

‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

Image
नवी दिल्ली : ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ संस्थेचा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार स्वीकारताना जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे. बाजूस संजय अवस्थी व बी. जी. चव्हाणके. ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान नवी दिल्ली येथे ‘शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात सन्मान कराड, ता. ४ : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत...

‘ए.आय.’च्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहणे गरजेचे : डॉ. मीना चिंतामणेनी

Image
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना डॉ. मीना चिंतामणेनी. बाजूस डावीकडून डॉ. एन. आर. जाधव, डॉ. जी. हिमाश्री, डॉ. एम. व्ही. घोरपडे, प्रा. डॉ. जी. एम. विद्यासागर, डॉ. एस. आर. पाटील. ‘ए.आय.’च्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहणे गरजेचे : डॉ. मीना चिंतामणेनी कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेला प्रारंभ; ४०० हून अधिकजण सहभागी  कराड, दि. 3 : सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात आर्टीफिशियल इंटिलिजन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाचा आहे. ए.आय. तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातही याचा प्रभाव वाढू लागला आहे. अशावेळी ‘ए.आय.’च्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहत, आपली ज्ञानकौशल्ये वृद्धींगत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्र-कुलगुरु डॉ. मीना चिंतामणेनी यांनी केले. कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम...

कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

Image
कराडात उद्या विकासपर्व जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन. कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचा सिद्धांत रुजवणारे सेवावृत्ती पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू पाटसकर यांच्या माध्यमातून विकासपर्व जनसेवा कार्यालयाचा शुभारंभ शनिवार दि. 1 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या संकल्पनुसार समाजात विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व भाजप महाराष्ट्र प्रदेशचे विशेष निमंत्रित सदस्य सुदर्शन विष्णू प...